Tomato rates viral letter ; टोमॅटोचे दर वाढले म्हणून ओरडणाऱ्यांनो शेतकऱ्याचं हे पत्र नक्की वाचा

0
47

Tomato rates viral letter : काही महिन्यांपूर्वी अगदी उत्पादन खर्चही न काढून देणारा टोमॅटो आज सोन्याचे दिवस शेतकऱ्यांना दाखवत आहे. मात्र टोमॅटोचे वाढलेले दर सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यातच टोमॅटोच्या वाढत्या भावांवर अनेक रिल्स व्हिडिओज सोशल मीडियावर बघायला मिळतात तर टोमॅटोच्या वाढत्या भावांमुळे सेलिब्रिटीनी देखील आपण टोमॅटो खाणे कमी केले असल्याच्या कमेंट्स केल्याचं बघायला मिळत आहे. मात्र शेतकऱ्याने टोमॅटो पिकवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि या वाढत्या भावांवर त्यांचं मत काय हे जाणून घेणं कुणालाही महत्त्वाचं वाटत नाही टोमॅटोला जेव्हा भाव मिळत नाही तेव्हा तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून पिकवलेला शेतमाल रस्त्यावर फेकून देतो त्यावर कोणी रिल्स बनवत नाही. आणि शेतकऱ्यांच्या व्यथा कोणालाही जगासमोर मांडाव्याश्या वाटत नाही. अशाच रील स्टार्स ना आणि कमेंट्स करणाऱ्यांना अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पत्र लिहिले आहे. आणि हे पत्र सोशल माध्यमातून सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

https://thepointnow.in/the-police-chased-the-person-who-tried-to- spread-terror-on-the-road/

अहमदनगर जिल्ह्यातील महादेव शेळके या शेतकऱ्याने हे पत्र लिहिल आहे. या पत्राबरोबर त्यांनी काही फोटोज देखील शेअर केले आहेत या व्हायरल पत्रामध्ये शेतकरी म्हणतो की,
नमस्कार, मी महादेव शेळके अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील शेतकरी. बरेच दिवस झाले मोबाईल सुरू केला की टोमॅटोचे भाव खूपच वाढले आहेत असे एकच चित्र समोर येतं आहे. अनेक व्हिडिओमध्ये टोमॅटोचे भाव आता परवडत नाही असा मजकूर बघायला मिळतो. मात्र टोमॅटोचे भाव वाढल्याने खरंच कोणाच्या आयुष्यात काही फरक पडलाय का? मला तर असं मुळीच वाटत नाही, लोक व्हिडिओ बनवतात स्वतःला पैसे मिळवण्यासाठी वेडेवाकडे चेहरे करून स्वतः पैसे कमवतात. पण त्यांच्या या कृतीमुळे टोमॅटो खरच महाग आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होतो.

 

गावाकडे भाजी करण्यासाठी टोमॅटोची सहसा गरज भासत नाही. त्याचा फारसा काही फरक पडत नाही. शहरात मात्र टोमॅटो ग्रेव्ही, टोमॅटो सॉस याशिवाय भागत नाही. चमचमीत खाद्यपदार्थ बनवण्यासाठी टोमॅटो लागतोच. खास करून हॉटेलवाले टोमॅटोचे भाव वाढले म्हणून आता पदार्थात टोमॅटो कमी घालतात. बर्गर मधून देखील टोमॅटो आता गायब झाला आहे. 20 रुपयांची भाजी बनवून हे लोक 300 रुपयांना विकतात. मग त्या भाजीमध्ये असा कितीसा टोमॅटो लागतो? असा प्रश्न या शेतकऱ्याने विचारला आहे.

 

हॉटेलमध्ये मोठ्या फायद्यात असून देखील तुम्हाला टोमॅटो देऊ शकत नाहीत. पण एखादा शेतकरी भाजी विकताना दिसला तर वीस रुपयांची भाजी तुम्ही दहा ते पंधरा रुपयांना मागता. बळीराजा कळ सोसून ओला दुष्काळ, सुका दुष्काळ यातून वाट काढतो. बी बियाणं रसायनांची फवारणी करतो. त्याला ती भाजी परवडते की नाही याचा विचार देखील तुम्ही कधीच करत नाही. सुशिक्षित आणि चांगले पैसे कमावून देखील तुम्ही शेतकऱ्याकडून आणखीन पाच रुपये कमी करण्याची अपेक्षा ठेवतात. पण अशी मागणी कोणीही हॉटेलात करत नाही. आता तरी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहा. लोकांना कायमच पगार वाढवून हवा असतो. पण शेतकऱ्याची कोथिंबीर दहा रुपयाची वीसला जरी झाली तरी त्याचा बाऊ करतात. मात्र यामागे शेतकऱ्याची व्यथा कोणालाही दिसत नाही.

 

एखाद्या व्हिडिओ बनवणाऱ्याने एकदा तरी शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून तो दीडशे रुपयांचा टोमॅटो येण्यासाठी किती रुपयांच बी लावलं. यावर व्हिडिओ बनवावा खरंतर शेतकऱ्याला ते दीडशे रुपये भेटतच नाही शेतकऱ्याच्या झोळीत फक्त 60 ते 70 रुपये पडतात निम्म्याहून जास्त पैसे व्यापारीच खाऊन जातात. पिकवणाऱ्याला ते विकता येत नाही ही मोठी खंत आहे. असं म्हणत या शेतकऱ्याने टोमॅटोचे भाव वाढले असे म्हणणाऱ्यांना चांगलीच चपकार लगावली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here