द पॉईंट नाऊ ब्युरो : माणसाला आयुष्यात केव्हा कसली आर्थिक अडचण येईल सांगता येत नाही. या कारणाने माणूस कर्ज काढतो. मात्र माणसाच्या आयुष्यात सर्वात मोठं ओझं हे डोक्यावर असलेलं कर्ज असतं, असं देखील म्हटलं जातं. याच कर्जाला कंटाळून वर्धा येथील शेतकरी दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यातील पतीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्याच्या पिंपळगाव येथील राजेंद्र चरडे आणि त्यांच्या पत्नी अर्चना चरडे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. याच कर्जाच्या ओझ्याला कंटाळून दोघांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेच्या एक महिन्यानंतर पती राजेंद्र चरडे यांचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांच्या पत्नी अर्चना चरडे यांना आता घरी सोडण्यात आले आहे.
कर्जाच्या ओझ्याने हे दाम्पत्य खूप त्रस्त झालेले होते. याच कारणास्तव त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम