द पॉइंट नाऊ
भारत जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. तर साखर निर्यातीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. NFCSFL च्या आकडेवारीनुसार, भारतातील साखरेच्या उत्पादनात यंदा १५ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.
यंदा राज्यात उसाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे ३० मेपर्यंत राज्यातील साखरेच्या उत्पादनात वाढ झाली. ३० मेपर्यंत देशात एकूण ५० साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड (NFCSFL) च्या आकडेवारीनुसार, चालू वर्षाच्या शेवटापर्यंत आणखी ४-५ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. साखरेचे विपणन वर्ष ऑक्टोबर ते सप्टेंबर या दरम्यान असते.
देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य उत्तरप्रदेश आहे. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू वर्षात उत्तरप्रदेशमधून उत्पादित होणाऱ्या साखरेमध्ये घट झाली आहे. उत्तरप्रदेशमध्ये गेल्यावर्षी ११.०१ दशलक्ष टन उत्पादित झाली होती. यंदा मात्र त्यामध्ये घट होऊन १०.२२ दशलक्ष टन साखर उत्पादित झाली आहे.
देशात महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात साखरेचे उत्पादन वाढ होण्याची अपेक्षाही वर्तवण्यात आली आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात १०.६३ दशलक्ष टन इतके साखरेचे उत्पादन झाले होते. तर चालू वर्षात ३० मेपर्यंत साखरेचे उत्पादन १३.६८ दशलक्ष टन झाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम