द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : बागलाण तालुक्यात खामलोण येथे एका शेतकऱ्याच्या कांदा भरलेल्या चाळीत अज्ञातांनी युरिया टाकुन दिल्याने संपूर्ण कांदाच खराब झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खामलोण येथील अभिमन वेडू धोंडगे यांच्या शेतातील कांदा चाळीत त्यांनी आपला कांदा पुढे भाव भेटेल या आशेखाली ठेवलेला होता. मात्र काही अज्ञात समाजकटकांनी या चाळीतील कांद्यावर युरिया टाकून दिल्याने संपूर्ण कांदाच वाया गेला. जवळपास 10 लाख रुपयांचे नुकसान यामुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नुकताच खामलोण परिसरात चांगलाच पाऊस झाल्या कारणाने, शेताकडे बघण्यासाठी गेले असता, त्यांना आपल्या कांदा चाळीत कोणीतरी रासायनिक खत टाकून दिल्याचे निदर्शनास आले. यामुळे चाळीतील संपूर्ण कांदाच खराब झाला.
दरम्यान, धोंडगे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मोठ्या मेहनतीने आणि पैसा खर्च करून पिकवलेला कांदा असा नाहक कोणीतरी खराब केल्याने, धोंडगे यांनी दुःख व्यक्त केले.
माणसाची विकृत मनस्थिती दुसऱ्याचं होत असलेलं भलं सहन करू शकत नाही. अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत. याआधी देखील अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम