Ram Mandir | राज्यात हे घडतंय काय..?; अयोध्येला निघालेल्या ट्रेनवर दगडफेक

0
49
Ram Mandir
Ram Mandir

Ram Mandir |  गेल्या महिन्यात २२ तारखेला अयोध्या येथे राम मंदिराचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी अयोध्येत मोठ्या प्रमाणात रामभक्त आले होते. यामुळे अयोध्येत मोठी गर्दी जमल्याने अनेकांना तेथे जाणे जमले नाही. त्यामुळे गर्दी कमी झाली की, मग जाऊ असा अनेकांचा मानस होता. दरम्यान, यासाठी आता अनेक राज्यांतून विशेष रेल्वे आणि बस ह्या आयोध्येकडे जाणाऱ्या भाविकांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.

यांना नगरिकांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, याबाबतच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात आयोध्येच्या दिशेने निघालेल्या एका ट्रेनवर महाराष्ट्रात काल रात्रीच्या सुमारास दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. सूरतहून अयोध्येच्या दिशेने  निघालेल्या या ‘आस्था स्पेशल ट्रेन’वर दगडफेक झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवासी घाबरले होते. दरम्यान, त्यांनी प्रसंगावधान राखत लगेच दार, खिडक्या बंद केल्या.(Ram Mandir)

Ram Mandir | रामलल्ला आता तंबूत नाही, दिव्य मंंदिरात राहतील – पं. नरेंद्र मोदी

Ram Mandir | नेमकं प्रकरण काय..?

सूरतकडून अयोध्येकडे जाणाऱ्या आस्था विशेष ट्रेनवर काही समाजकंटकांनी रविवारी जोरदार दगडफेक केली. सूरतहून रात्री आठ वाजेच्या सुमारास ही ट्रेन अयोध्येला जाण्यासाठी निघाली होती. ही ट्रेन नंदूरबार येथे पोहोचताच रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास अचानक ही दगडफेक सुरु झाली. यामुळे ट्रेनमधील प्रवासी काहीकाळ बिथरले होते. त्यांनी तातडीने ट्रेनचे सर्व दरवाजे, खिडक्या बंद केल्या मात्र, तरीही अनेक दगड ही ट्रेनच्या आत येऊन पडले. अद्याप तरी या दगडफेकीत कोणी जखमी झाल्याची माहिती समोर आली नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जीआरपी व आरपीएफने प्राथमिक तपासानंतर ट्रेनला पुढील दिशेने रवाना केलं. पोलीस या प्रकारची सविस्तर चौकशी करत असून, जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार ही आस्था स्पेशल ट्रेन रविवारी रात्री ८ वाजता सुरतकडे निघाली होती. एकूण १,३४० प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करत होते. ट्रेनमधील प्रवासी हे जेवल्यानंतर भजन करत असताना, पावणे अकरा वाजेच्या सुमारास ही ट्रेन महाराष्ट्रात नंदूरबार येथे पोहोचली. येथे काहीवेळ ट्रेन थांबली असता, अचानक ट्रेनवर दगडफेक सुरु झाली.(Ram Mandir)

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठेपूर्वी मोठी बातमी..! श्रीरामांच्या शोभा यात्रेवर दगडफेक

प्रवाशांनी सांगितले थरारक अनुभव… 

या ट्रेनमधील प्रवाशांनी सांगितल्यानुसार, ट्रेनमध्ये अनेक बाजूंनी दगड येत होते. हे काम एकाने नाही तर, अनेक जणांनी केल्याचा संशय आहे. या प्रकारामुळे प्रवासी घाबरले होते आणि त्यांनी तत्काळ ट्रेनच्या दरवाजे, खिडक्या बंद केल्या. मात्र, दगडफेक इतकी जोरदार होती की, तरीही अनेक दगड हे ट्रेनच्या आतमध्ये येऊन पडले.(Ram Mandir)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here