द पॉईंट नाऊ ब्युरो : शेतकरी वर्गाला आपल्या शेतातील पिकांकडून मोठ्या अपेक्षा असतात. मात्र आता कांद्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
सध्याच्या घडीला कांद्याचे भाव पुन्हा गडगडले असून, ते निव्वळ 200 ते जास्तीत जास्त 1200 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकरी वर्गासमोर संकट पुन्हा आ वासून उभे राहिले आहे. आधीच एक ना अनेक समस्यांमुळे शेतकरी वर्ग हवालदिल असतांना, अपेक्षा असलेल्या कांद्याने पुन्हा एकदा निराशा केलेली आहे.
येवला येथे 200 ते 1050 रुपये, पिंपळगाव बसवंत येथे 300 ते 1350 रुपये, लासलगाव येथे 500 ते 1350 रुपये, मनमाड येथे 300 ते 1080 रुपये असे विविध ठिकाणी कांद्याने पुन्हा संकटाचे ढग गडद केले आहेत.
या परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. आता हे कांद्याचे बाजार भाव कधी अपेक्षित दर गाठतील याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम