विठुरायाचा गजर आता कोणत्याही निर्बंधांविना; पंढरपुरच्या वारीवर नसतील कोणतेच निर्बंध

0
46

द पॉईंट नाऊ ब्युरो : 

‘ओढ तुज लागे मन घेईना विसावा,
हे पंढरीनाथा तू ऐकलास धावा’
असच काहीसं सध्या वारकरी संप्रदायातील लोकांचं मन सांगत असावं. कारण, महाराष्ट्र शासनाने आता पंढरपूर वारी ही कोणत्याही निर्बंधांविना निघेल हे स्पष्ट केले आहे.

मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रकोपाने वारकरी बांधवांना विठुरायाच्या दर्शनासाठी मनोभावे जाता आले नाही. गर्दी टाळण्याच्या उद्देशाने अनेक निर्बंध लादण्यात आले. मात्र आता पंढरपूरच्या आषाढी वारीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतील. असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याआधी पंढरीची वारी ही यंदा होईलच आणि पूर्ण क्षमतेने होईल, असे म्हटले होते. त्यावर आता राजेश टोपे यांच्या घोषणेनंतर शिक्कामोर्तब झाले आहे. आता पंढरीच्या विठुरायाची ओढ लागलेल्या लाखो वारकरी बांधवांना कोणतीही अडवणूक नसेल, पूर्ण जोशात, आनंदात, पूर्ण क्षमतेने त्यांना आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी जाता येईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here