Nashik News | कांदा व्यापाऱ्यांचा बंद मागे…; पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांची घोषणा

0
61

Nashik News : जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेली कांदा कोंडी दूर झाली असून नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या शिष्टाईला यश आले आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या बैठकीनंतर भुसे यांनी दूरध्वनीवरून व्यापाऱ्यांशी संवाद साधला तसेच सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत तोडगा काढला. आज लासलगाव बाजार समितीच्या विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात सोमवारी लिलावाला सुरुवात झाली.  जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये लिलाव उद्यापासून पूर्ववत होतील. अशी माहिती पालकमंत्री भुसे यांनी दिली. (Nashik News)

केंद्रीय मंत्र्यांची धावाधाव….

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी बैठक घेत तोडगा काढला मात्र याचवेळी घरी असलेल्या डॉ. भारती पवार यांना तोडगा निघणार असल्याचे समजताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. पालकमंत्री भुसे यांना श्रेय जायला नको म्हणून ही धावाधाव असल्याची चर्चा यावेळी उपस्थित शेतकरी वर्गात रंगली होती. यामुळे प्रसिद्धीसाठी मंत्री पवार या जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या की शेतकऱ्यांसाठी याबाबत मात्र चर्चेला उधाण आले होते.

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय!अनेक मार्गांवर स्पेशल ट्रेन

जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असून यावेळी कांदा उत्पादक वेठीस धरल्याचे चित्र निर्माण झाले होते. कांदा व्यापाऱ्यांनी आपली खरेदी काही मांगण्यांसाठी थांबवली होती. यातील मागण्या काही केंद्र आणि काही मागण्या राज्य पातळीवरील आहेत. यासंदर्भात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी बैठक घेतली होती. यावेळी संप मागे घेण्याची विनंती भुसे यांनी केली होती. मात्र तोडगा निघाला नव्हता, कांदा प्रश्ना संदर्भात व्यापाऱ्यांच्या या मागण्यांबात 26 तारखेला मंत्रालयात देखील बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी देखील कांदा खरेदी करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते. मात्र व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बाबत निर्णय घेतला नव्हता आज अखेर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दूरध्वनीवरून पुन्हा व्यापाऱ्यांशी संवाद साधून तोडगा काढला आहे.

Asian Games 2023 | किदाम्बी श्रीकांत याचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमधील एक हजारहून अधिक व्यापारी लिलावातून दूर झाल्यामुळे २० सप्टेंबरपासून कांदा लिलाव पूर्णत: बंद होते. या संपुर्ण काळात शासन व प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका पार पडल्या. मात्र मागण्या मान्य होत नसल्याने व्यापारी माघार घेण्यास तयार नव्हते. याता परिणाम म्हणुन दैनंदिन एक लाख क्विंटलचे लिलाव थांबले होते. त्यामुळे २० ते २५ कोटींची उलाढाल मंदावली. जिल्हा प्रशासनाने तात्पुरते परवाने देऊन आणि अन्य जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना लिलावात उतरवून बाजार समित्यांना पर्यायी व्यवस्था उभारण्याचे निर्देश दिले होते. याच्या अंतर्गत लासलगाव बाजार समितीने आधी विंचूर, त्यानंतर निफाड उपबाजारात लिलाव पूर्ववत केले आहेत. विंचूर उपबाजारात चार दिवसांत सुमारे ८० हजार क्विंटलचे लिलाव होऊन त्यास सरासरी २१०० रुपये मिळालेनिफाड उपबाजारात १८०० क्विंटलचे लिलाव झाले. सरासरी दोन हजार रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here