Manoj Jarange | मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिलेल्या लढ्याला मोठे यश मिळाले असून, राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केली आहे. त्यामुळे सध्या राज्यभरात मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनोज जरांगे यांनी ‘संघर्ष योद्धा’ तर, एकनाथ शिंदे यांना ‘शब्द पाळणारे मुख्यमंत्री’ अशी उपाधिही देण्यात आली आहे. आज मनोज जरांगे हे रायगडावर जाणार असून, त्याआधी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
मराठा समाजाच सर्वेक्षण सुरु असून, यातून काही संतापजनक बाबी समोर आल्या आहेत, असा प्रश्न जरांगे यांना माध्यमांनी विचारला असता, त्यावर त्यांनी “मराठा समाज हा मागासच आहे. हे आता राज्य सरकारने सिद्ध कराव. ती पूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे” असं उत्तर दिलं आहे.(Manoj Jarange)
Manoj Jarange Mumbai | मराठा समाजाच्या ‘या’ मागण्या मान्य
तर, “रायगडावर आल्यावर विजय मिळतो, अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. “कधी नव्हे, तो आता तब्बल ७० वर्षानंतर मराठ्यांसाठी कायदा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेलच, पण त्या सोबत सग्यासोयऱ्यांनाही या आरक्षणाचा लाभ मिळेल. एकही मराठा हा कुणबी म्हणून ओबीसीत जाण्यापासून वंचित राहायला नको. मराठ्यांचा विजय झाला. मात्र, नव्या कायद्यानुसार पहिलं प्रमाणपत्र हे मिळालं की, मग आपण महादिवाळी साजरी करु, गुलाल उधळू” असंही जरांगे यावेळी म्हणाले.
Manoj Jarange | जरांगे इंग्लिश आणि हिंदी शिकताय
“मी आता इंग्लिश आणि हिंदी शिकतोय” असे जरांगेंनी सांगितले असता, त्यांना “हिंदी शिकण्याची काय गरज? हा प्रश्न मध्यममणी विचारला यावर जरांगे पाटील म्हणाले, “यासाठी अनेक कारणं आहेत. शेतकरी व मराठ्यांच्या जीवनात मला परिवर्तन आणायचे आहे. लांब नाव चालवत असताना पोहण्यासाठी देखील स्वत:णे परिपूर्ण असायला हवं. ही लांब पल्ल्याची लढाई असून, आता पुढे भविष्यात काहीही होऊ शकतं” असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर पुढे आणखी इतर दोन समाजांसाठी आरक्षणाचा लढा लढण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला आहे.(Manoj Jarange)
Maratha Reservation | आता मराठ्यांनी ‘एक ओबीसी, लाख ओबीसी म्हणावं…
कर तुला काय करायचंय ते..;भुजबळांवर टिका
तसेच यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की,”आता मराठ्यांना आरक्षण मिळालं की, धनगर आणि मुस्लिम समाजालाही हे आरक्षण कसं देत नाही तेच बघतो. मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा हा ज्वलंत आहे. त्यामुळे आता ते झाल्यानंतर धनगर आणि मुस्लिम समाजाला सरकार आरक्षण कसं देत नाही तेच मी बघतो?” या शब्दांत जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
दरम्यान, “ओबीसीसाठी जर काही करता आलं नाही, तर मी मंत्रिमंडळातून राजीनामा देणार, असल्याच्या छगन भुजबळांच्या वक्तव्यावर जरांगे म्हणाले की,“त्याने आधीच राजीनामा द्यायला हवा होता. आता राजीनामा देऊन काय उपयोग?. त्याला म्हणा कर तुला काय करायचंय ते, सरकार कुठे काय त्याला भीतय का?” असा टोलाही त्यांनी भुजबळांना लगावला आहे. (Manoj Jarange)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम