Loksabha 2024 | आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. दरम्यान, या निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची आर्थिक स्थिती यामुळे खराब झाली असून, काँग्रेस पक्षाचे बँक अकाऊंट फ्रीज करण्यात आले आहे. त्यामुळे आता पक्षाकडे ना पगार देण्यासाठी पैसे आहेत. ना कसलेही बिल भरण्यासाठी. तसेच ना बँकेत पैसे जमा करता येत आहेत. ना बँकेतून ते पैसे काढता येत आहे, अशी माहिती अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.(Loksabha 2024)
दरम्यान, या पत्रकार परिषदेत काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर मोठे आरोप केले आहेत. यानुसार, काँग्रेस व यूथ काँग्रेसचे बँक अकाऊंट हे फ्रिज करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर, बँक अकाऊंट फ्रिज झाल्यामुळे ना कोणाचे पगार करण्यासाठी पैसे आहेत. ना कुठले बिल भरण्यासाठी. आपल्या देशात आता लोकशाहीदेखील फ्रिज झाली आहे.
Maratha Reservation | जरांगेंना आंदोलनाची गरज नव्हती; काय म्हणाले मुख्यमंत्री..?
देशातील प्रमुख पक्षाचे अकाऊंट फ्रिज
आगामी लोकसभा निवडणुका या आता कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची स्थिती असतानाच, असं पाऊल उचलून केंद्र सरकारला नेमकं काय सिद्ध करायचं आहे?. देशातील एका प्रमुख पक्षाचे बँक अकाऊंट फ्रिज करण्यात आले असून, आयकर विभागाने २१० कोटी रुपयांची रिकवरी मागितली आहे. तसेच, “२०१८-१९ मधील इनकम टॅक्स फायलिंगच्या आधारे कोट्यवधी रुपये मागितले जात आहेत. ही लोकशाहीची हत्या आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्याआधी आमचे बँक खाते ब्लॉक करण्यात आले आहेत. काँग्रेस पार्टी ही मेंबरशिपच्या माध्यमातून यूथ काँग्रेसकडून पैसे जमवत असते आणि आता तेदेखील फ्रिज करण्यात आले असल्याचा आरोप अजय माकन यांनी केला आहे.(Loksabha 2024)
Dada Bhuse | मंत्री दादा भूसेंनी मांडला राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अहवाल
Loksabha 2024 | पगार देण्यासाठीही पैसे नाही
काँग्रेस पक्षाला रिर्टन फाइल करण्यासाठी थोडा उशीर झाला होता. ४५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता, याचा अर्थ लगेच अकाऊंट फ्रिज करणे असा होत नाही, असंही अजय माकन यावेळी म्हणाले. सगळ काही प्रभावित झालं आहे. आता लाइट बिल भरण्यासाठी किंवा कोणाचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. तसेच बँकेत पैसे जमा करता येत नाही किंवा बँकेतून पैसे काढताही येत नाही.(Loksabha 2024)
इलेक्टोरल बॉन्ड अवैध
सर्वोच्च नयायलयाने एका दिवसापूर्वीच इलेक्टोरल बॉन्डबद्दल एक मोठा निर्णय घेतला होता. त्यानुसार सुप्रीम कोर्टाने निवडणूक बॉन्डच्या वैधतेलाच असंवैधानिक ठरवलं गेलं होतं. यामुळे माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन होत आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. त्यामुळे इलेक्टोरल बॉन्डला वैध मानता येणार नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानेदिला आहे. (Loksabha 2024)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम