काय सांगता! दिवाळीनंतर लग्नाचा हंगाम सुरू होत असतो. लग्नाआधी लोक कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत भरपूर खरेदी करत असतात. ही खरेदी केवळ वधू-वरांसाठी नाही तर या लग्नाला येणारे लोक देखील शॉपिंगही करत असतात. यामुळेच देशात लग्नाच्या हंगामात लाखो रुपयांचा व्यवसाय होत असतो. तर हाच आकडा ४.२५ लाख कोटी रुपये आहे. या हंगामात, लोक लग्नाच्या खरेदीवर प्रत्येक सेकंदाला सरासरी 21 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करत असतात. नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत देशात 35 लाखांहून अधिक लग्न होणार आहेत.
धक्कादायक! बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी देत लुटले दहा लाख; आई-मुलाची अजब करामत
4.25 लाख कोटींची होणार उलाढाल
लग्नाच्या खर्चाशी संबंधित दागिने, कपडे, शूज आणि डिझायनर कपड्यांशी संबंधित व्यवसाय विक्री नोव्हेंबर ते जानेवारी अखेरीस 8 टक्के ते 11 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सीईओ कुमार राजगोपालन यांनी व्यक्त केलेली आहे. यंदा महागाईचा फटका बसलेला असला तरी या हंगामाच्या पहिल्या आठवड्यात चांगला व्यवसाय व्यवसायिकांना अपेक्षित आहे. 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत एकूण विक्री सुमारे 4.25 ट्रिलियन रुपये (51 अब्ज) असणार आहे, असा Confederation of All India Traders चा अंदाज आहे. लग्नांच्या खरेदीवर प्रत्येक सेकंदाला 21.37 लाख रुपये खर्च केले जाऊ शकतात.
Nashik news | नाशिक मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार..! सर्वपक्षीय नेत्यांचे आज रास्ता रोको
कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
भारतात सोन्याची वार्षिक मागणी सुमारे 800 टन आहे. निम्म्याहून त्यातील अधिक खरेदी ही लग्नासाठी केली जात असते. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भारत हा सोन्याचा ग्राहक असलेला देश मानला जातो. या काळात सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा टायटन कंपनीच्या तनिष्क, सेन्को गोल्ड लिमिटेड, त्रिभोवन दास भीमजी झवेरी लिमिटेड आणि कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड यांना होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम