ई – केवायसी करा अन्यथा पैसे येणे होणार बंद; शेवटचे 4 दिवस बाकी

0
40

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करून बराच काळ उलटला यात अनेक शेतकऱ्यांना मदत झाली तर काही शेतकऱ्यांना मिळालेला पैसा परत करावा लागला कारण त्यांचे नाव या सन्मान निधीत बसले नाही. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई- केवायसी करणे आवश्यक असून लाभार्थी शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्ट पर्यंत ई-केवायसी करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

काही शेतकऱ्यांना हा सन्मान निधीचे काही हप्ते मिळाले नाहीत कारण शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या शेतकरी लाभार्थ्यांनी हा निधी मिळविण्यासाठी ई-केवायसी करावी अन्यथा पुन्हा हा निधी मिळणार नाही व ही सेवा बंद होईल त्यामुळे ३१ ऑगस्ट पर्यंत ई- केवायसी करण्याचे आवाहन देवळा तहसीलदार विजय सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सचिन देवरे, गटविकास अधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.

सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरीत करण्यास प्रारंभ झालेला आहे.

ज्या लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा पुढील हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. सर्व पात्र लाभार्थ्यांना ३१ ऑगस्ट २०२२ पासून योजनेच्या पुढील लाभाचे हप्ते निरंतर मिळण्याकरीता ई- केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे. याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वेबसाईटवरील टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान अॅपद्वारे ओटीपी आधारे लाभार्थ्यांना स्वतः ई केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर ई- केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल.

केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर शासनामार्फत रुपये १५/- फक्त निश्चित आहे करण्यात आला आहे.

पी. एम. किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील ऑगस्ट – नोव्हेंबर २०२२ या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापुर्वी ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असुन दि. ३१ ऑगस्ट २०२२ अखेरपर्यंत ही प्रक्रीया पूर्ण करण्यात यावी. तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  1. योजनेचे पैसे या शेतकऱ्यांच्या खात्यात अजिबात येणार नाहीत.
  2. या शेतकऱ्यांना हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत.
  3. ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन आहे.
  4. ज्यांची नावे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या भूमी अभिलेखात नोंदलेली आहेत.
  5. ज्यांच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त लागवडीयोग्य जमीन आहे.
  6. केंद्र किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत मंत्रालय/कार्यालये किंवा विभागांमध्ये सेवारत किंवा सेवानिवृत्त कर्मचारी जे संस्थात्मक शेतकरी आहेत.
  7. अशा प्रकारे लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा
  8. तुम्हाला प्रथम त्याच्या अधिकृत पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल.
    ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा आणि ‘लाभार्थी यादी’ पर्यायावर क्लिक करा.
  9. एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाची माहिती द्यावी लागेल.
    त्यानंतर ‘Get Report’ वर क्लिक करा आणि लाभार्थी यादीत तुमचे नाव तपासा.

या तारखेपर्यंत ई-केवायसी करा.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी. करणे अत्यंत आवश्यक आहे. पीएम किसान योजनेच्या वेबसाइटला भेट देऊन शेतकरी 31 ऑगस्टपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. जर तुम्ही या तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुम्हाला 12व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here