देवळा : उन्हाळी कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने आज दि २३ रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लिलाव बंद करून पाचकंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले. यानंतर आमच्या भावना शासना पर्यंत पोहच कराव्यात यामागणीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना देण्यात आले .
उन्हाळी कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. महागडे कांदा बियाणे विकत घेऊन कांद्याची लागवड केली यासाठी हजारो रुपये खर्च झाला आहे . कांद्याला भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला आहे . मात्र , या कांदयाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे . खर्च देखील वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडा आहे .
शासनाला शेतकऱ्यांच्या संतप्त भावना कळाव्यात यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या व संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देवळा बाजार समितीत येऊन कांदा लिलाव बंद करून पाच कंदील वर रास्ता रोको आंदोलन केले . यानंतर आंदोलनकर्ते व शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे , युवा तालुका अध्यक्ष बापू देवरे ,तालुका अध्यक्ष नानाजी आहेर , युवा तालुका अध्यक्ष शशिकांत पवार ,सटाणा तालुका अध्यक्ष गणेश काकुळते , खर्डे येथील उपसरपंच सुनील जाधव , विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार ,माधव ठोंबरे , भाऊसाहेब पवार , शशिकांत ठाकरे ,विनोद आहेर , नाना गांगुर्डे , रामदास पवार , नितीन देवरे , आदी शेतकरी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम