Chhagan Bhujbal | अहमदनगरमध्ये आयोजित ‘ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार’ सभेत नाभिक समाजाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केले होते. यानंतर याबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले आणि यामुळे हा मुद्दा राज्यभरात चर्चेत होता. दरम्यान, यावर आता मंत्री भुजबळ यांनी त्यांची बाजू मांडली असून, “अहमदनगर येथे झालेल्या ‘ओबीसी भटक्या विमुक्त एल्गार’ मेळाव्यात नाभिक समाजाबद्दल केलेलं हे वक्तव्य हे एका बांधवाने त्याच्या गावातील केलेल्या तक्रारीमुळे केलेलं असून, हे वक्तव्य केवळ त्या गावापुरतेच मर्यादित आहे. त्यामुळे कुणीही या वक्तव्याचा विपर्यास करू नये” असे स्पष्टीकरण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.(Chhagan Bhujbal)
Uddhav Thackeray | मी पंतप्रधानांना नाही, पंतप्रधान मला शत्रू मानतात
Chhagan Bhujbal | गावापूरतेच मर्यादित
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “एका गावातील नाभिक समाजाच्या कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ पोस्ट केली असता, त्या नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या दुकानात केस कापायला जायचं नाही. अशी तिथल्या मराठा समाजाने भूमिका घेतली होती. अशी बहिष्काराची भाषा जर कोणी करत असेल तर नाभिक बांधवांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाका असे अहमदनगर येथे ओबीसी भटके विमुक्त एल्गार सभेत आपण आवाहन केले होते.(Chhagan Bhujbal)
तसेच सभेत केलेलं हे वक्तव्य पूर्णतः त्या गावापुरते मर्यादित आहे. मात्र, समाज माध्यमांवर या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. ही अतिशय चुकीची बाब असल्याचे” भुजबळ यांनी म्हटले आहे. तसेच अर्धवट क्लिप व्हायरल करून काही समाजकंटक हे नाभिक बांधवांमध्ये गैरसमज निर्माण करत असल्याने नाभिक बांधवांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम