विकी गवळी – प्रतिनिधी : चांदवड | देशांतर्गत कांद्याला असलेली मागणी आणि त्या तुलनेत कमी होणारा कांद्याचा पुरवठा तसेच कांदा दरात सातत्याने होत असलेले चढ-उतारामागे नेमके कारण काय आहे? हे शोधण्यासाठी आज नाशिकच्या चांदवड तालुक्यातील दुगाव येथे केंद्रीय पथकाने पाहणी केली.
वादातून पत्नीचं भिंतीवर डोकं आपटलं नंतर पती मुलांसह झोपी गेला; सकाळी धक्कादायक बाब समोर
या केंद्रीय पथकाच्या पाहणीत त्यांनी थेट शेताच्या बांधावर जात कांदा पिकांची सद्यस्थितीत असलेली अवस्था बघितली आहे. केंद्र सरकाराच्या कांदा विरोधी धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त झालेला आहे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा हा शेतकऱ्याचा नसून व्यापाऱ्यांचा आहे. कांदा साठवणूकीसाठी शेतकऱ्यांना सबसिडी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मोठी बातमी | लासलगाव बाजार समितीत आजपासून १२ दिवस कांद्याचे लिलाव राहणार बंद
तसेच दुष्काळी परिस्थितीसह अनेक व्यथा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या पथकासमोर मांडल्या आहेत. दुष्काळी हेक्टरी लाख रुपये खर्च करून कांदा लागवड करायची पण कांदा उत्पादनच होत नसल्याने हाती एक रुपयादेखील पडणे कठीण झाल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाला सांगितले. केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाचे संचालक सुभाषचंद्र मिना आणि कृषी मंत्रालयाचे सहआयुक्त बी. के. पोष्टी यांच्यासह उपस्थित अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत केंद्राला तसा अहवाल पाठविण्यात येईल असे सांगितलेले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम