द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक मध्ये शेतकरी वर्गाला कांद्याचे भाव खूपच खाली आल्याने मोठा फटका बसत आहे. सोमवारी लासलगाव बाजार समितीत लाल कांदा 600 ते 900 रुपये, तर उन्हाळी कांदा 900 ते 1200 रुपयांपर्यंत विकला गेला.
मागील दोन वर्षात कोरोनाने शेतकरी वर्गाचे मोठे हाल केले आहेत. डोक्यावर कर्ज घेऊन पिकवलेलं पीक शेतकऱ्याला काहीही देऊ शकलं नाही. त्यात अवकाळी पावसाने देखील शेतकऱ्याचा मोठा घात केला आहे. अवकाळी पावसामुळे भिजलेल्या कांद्याला अवघा 200 ते 400 रुपये भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांना आपला ऐन हाता-तोंडाशी आलेला घास एक प्रकारे हिरावल्यासारखे झाले आहे. यावेळी शेतकरी वर्गाला कांदा पिकाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र कांद्याच्या उतरलेल्या भावांनी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
शेतकरी वर्गाने मोठ्या उमेदीने कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र अवकाळी पावसाने सारा कांदा भिजला. ज्यामुळे कांद्याच्या भावांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम