द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : टोमॅटो सध्या कवडीमोल दरात विकले जात आहे. सध्या टोमॅटोची आवक बघता मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकाचे उत्पादन झाले असून , टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजारभाव पडले आहे. याचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसला आहे.
या सर्व प्रकारची तात्काळ दखल घेत केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी मा. पियुषजी गोयल व कृषिमंत्री मा.नरेंद्रजी तोमर यांच्याशी संपर्क साधत हे कोसळलेले बाजारभाव बघता टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून त्वरित पत्रव्यवहार केला तथा फोन वर संभाषण केले असता टोमॅटो निर्यातीवर कुठलेही बंधन नसून निर्यात खुली आहे असे संबंधित मंत्री महोदयांनी सांगितले.
शेतकरी उत्पादकांनी घेतलेल्या टोमॅटो पिकाची उत्पादन खर्चा पेक्षा कमी विक्री होत असेल तर मार्केट इंटरवेनशन स्कीम (MIU) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळू शकतेआणि ह्याच स्कीमच्या माध्यमातून राज्यसरकारने जर मागणी केली तर केंद्रसरकार 50% तोटा सहन करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तयार असल्याचे केंद्रीय मंत्री महोदयांनी सांगितले. आता यासाठी राज्यसरकारने त्वरित केंद्राकडे मागणी केल्यास केंद्र सरकार निश्चितच अडचणीत आलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यास मदत करेल.
आता राज्य सरकारने त्वरित ह्याची दखल घेऊन तशी मागणी केंद्र सरकारकडे करावी. टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्याची तात्काळ दखल केंद्रसरकारने घेतल्या बद्दल ना.डॉ.भारती पवार यांनी भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल जी, कृषिमंत्री तोमर जी यांचे आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम