द पॉईंट नाऊ ब्युरो : शेतकरी वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ज्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची वीज तोडली गेली आहे. त्यांची आता पुन्हा वीजजोडणी केली जाणार आहे. महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात शेतकरी वर्गाला आपली शेती कृषी पंपांच्या साहाय्यानेच पिकवता येते. दरम्यान बहुतांश शेतकऱ्यांनी कृषी पंपांचे वीजबिल न भरल्याने त्यांची वीज तोडण्यात आली होती. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने केली गेली. विरोधी पक्षाने देखील याप्रकरणी सरकारला धारेवर धरले होते. मात्र आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी संबंधित शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला जाणार असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यात शेतकरी वर्गास पुढील पीक येईपर्यंत पुढील तीन महिने वीजपुरवठा कुठेही खंडित केला जाणार नाही. असे देखील उर्जामंत्र्यांनी सांगितल्याचे बोलले जात आहे.
उर्जामंत्र्यांच्या या वक्तव्याने शेतकरी वर्गास नक्कीच दिलासा मिळणार आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे. यावर निर्णय न झाल्यास, आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. आता याबाबत शासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम