कुबेर जाधव
विशेष प्रतिनिधी : तालुक्यातील गोदा व कादवा कार्यक्षेत्रातील भरपूर प्रमाणात ऊस शिल्लक आहे, फेब्रुवारीपर्यंत ऊस तुटायला पाहिजे होता. मात्र अद्याप हजारो हेक्टर ऊस शिल्लक असून बाहेरून कारखाने येतात त्यांनी सुध्दा ऊस तोड कामगारांच्या टोळ्या कमी केल्या आहेत, काही प्रमाणात द्वारकाधीश , धाराशिव (वसाका,) कादवा रानवड च्या टोळ्या सुरू आहेत, परंतु टोळी मुकादम मन मानि करत ,उस तोडणी साठी शेतकऱ्यां कडे अवास्तव आर्थिक मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
शेतकऱ्यांनि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी याबाबत,मा,खा,राजु शेट्टी यांच्या कडे तक्रार केली असुन उस उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. गेले
फेब्रुवारी संपत आला हे केव्हा ऊस तोडणार? असा प्रश्न प्रत्येक उस उत्पादक शेतकऱ्याला पडला आहे याबाबत त्वरीत सर्व शेतकरी संघटनांनी लक्ष घालावे असे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
नाशिक जिल्ह्यातील विशेषतः निफाड तालुक्यातील केजिएस हा कारखाना परिसरातील ऊस उत्पादकांसाठी आशेचा किरण होता , परंतु तो उभारणी नंतर पुरेशा क्षमतेने धड चालल्याचं ऐकिवात नाही ,तिन वर्षांपूर्वी चे उस उत्पादकांचे आर्थिक नुकसान झाले , फक्त बॅंक चे कर्ज उचलण्यासाठीच कारखान्याची उभारणी झाली की काय? असी शंका उस उत्पादक उघड पणे बोलताना परीसरातिल ऐकावयास मिळते आहे निफाड तालुक्यात सुरू वातिला एकुण पाच लाख टन उस उभा होता.
निफाड चे आमदार दिलीप काकांनी मा ,ना, अजित पवारांना बरोबर घेऊन रानवड कारखाना कसाबसा चालू केला त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी उस तोडणी सुरू आहे , पंरतु रानवड कारखाना हा अतिशय जुना असल्याने त्याची कार्यक्षमता अत्यल्प आहे , भविष्यात ती वाढदिवसाठी आ, दिलीप बनकर नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा शेतकऱ्यांनी केली आहे. अद्यापही निफाड तालुक्यात अंदाजे दोन लाख टना पेक्षा जास्त उस उभा आहे , त्यासाठी सर्वांनी उभा राहिलेला उस तोडणी साठी प्रयत्न करने गरजेचे आहे ,कादवा ,रानवड, या कारखान्या बरोबर वसाका, द्वारकाधीश ,प्रवरा नगर, कारखान्याच्या संचालक मंडळाला शेतकऱ्यांनि साकडे घातले आहे.
लवकरात लवकर निफाड तालुक्यातील चांगल्या साखर उतारा असलेला उस तोडणी करण्यासाठी पुरेशा प्रमाणात मजुर उपलब्द करून उस उत्पादनाचे अश्रू पुसण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव , निफाड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चे तालुका अध्यक्ष राम राजोळे यांनी केलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम