कृषी प्रतिनिधी : ई – पीक पाहणी मोबाईल ॲपच्या साहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे . महसूल विभागाचा ई पीक नोंदणी प्रकल्प हा १५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे .
या अॅप द्वारे आता पर्यंत सुमारे ९८ लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई – पिक पाहणी मोबाईल ॲप द्वारे आपल्या पिकांची नोंदणी केली आहे . सध्या रब्बी हंगामाच्या पीक पाहणीची कार्यवाही सुरु आहे . रब्बी हंगामाच्या पीक पाहणीच्या नोंदी साठी ई – पीक पाहणीचे 1.0.0.7 हे मोबाईल अॅपचे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे . तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे . रबी हंगामातील पिकांची ई- पीकपाहणी नोंदवण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी २०२२ आहे .
सर्व शेतकरी बांधवांनी मुदतीच्या आत रबी हंगामाची आपली पिक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पूर्ण करून घ्यावी .ई पीक मोबाईल अँपच्या सहाय्याने शेतकरी बांधवाना स्वतः जमिनीवर पिकांची माहिती भरता येणार आहे, याची अंतिम मुदत येत्या १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत असल्याची माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली . तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या रब्बी हंगामातील सर्व पिकांची माहिती ई पीक मोबाईल अँपच्या सहाय्याने भरून द्यावी , तसेच या ई पीक पाहणी मोबाईल अँपच्या कामात काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास आपल्या गावातील तलाठी, पोलीस पाटील किंवा स्वस्त धान्य दुकानदार यांचेशी संपर्क साधावा ,असे आवाहन शेवटी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी केले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम