नाशिक प्रतिनिधी : शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटांना सामोरे जावे लागत आहे, रब्बी हंगामातील Rabbi season कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड (Onion Cultivation) झाली आहे. मात्र योग्यवेळी रासायनिक खतांचा डोस देणे आवश्यक असतांना मिळत नाही, खरेदी-विक्री संघ आणि सोसायट्यांकडे खत उपलब्ध नसल्याने शेतकर्यांना खतटंचाईचा सामना करावा लागत आहे.
खतटंचाई ही विक्रेत्यांनी केली की खरोखर आहे याचं गूढ मात्र अद्याप उकळलेले नाही, ती टंचाई दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने (Maharashtra State Onion Growers Association) केली आहे. याबाबत कृषी सहसंचालकांना निवेदन देखील देण्यात आले. मात्र प्रशासन अद्यापही कुठला निर्णय घेण्याचा मानसिकतेत दिसत नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती जैसे थे आहे.
अनेक कृषी केंद्रात कृत्रिम टंचाईमुळे वाढीव दराने खतांची विक्री सुरू आहे. ज्या खतांची गरज नाही ती खते घेण्याची सक्ती केली जात आहे. नाशिक विभागातील शेतकरी यामुळे त्रस्त झाले आहेत.
कृषी विभागाने त्वरित पुरेशा प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध करावीत, कृषी केंद्रांची तपासणी करून जास्त दराने खत विक्री व इतर अनावश्यक खत खरेदी थांबवावी, अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सध कृषी कार्यालयास घेराव घालण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम