पुणे प्रतिनिधी : शेती देखील सध्या सट्टा झाला असून कधी कुठल्या पिकाला भाव येईल सांगता येत नाही. अवकाळी पाऊस, कडक थंडी, धुके, ढगाळ हवामान यामुळे शेवग्याच्या पिकाचा समतोल बिघडल्याचा परिणाम बाजारावर दिसत आहे. उत्पन्नात घट झाल्याने प्रचंड मागणी वाढली असून
आवक २५ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने बाजारात दर्शन दुर्मीळ झाले आहे. जेथे उपलब्ध आहे, तेथे गुणवत्ता कमी आहे. दरही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारा आहे. बाजार समितीत सध्या ६०० ते १०५० रुपये प्रति दहा किलो असा शेवग्याचा दर आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा ३०० रुपयांनी कमी आहे. (drumsticks vegetable rate incresed in kolhapur and other district due to untimely rains) यामुळे महागड्या भाजीपाल्यात शेवगा एक नंबर वर आहे.
सध्या शेवग्याच्या दराने अचानक उसळी घेतली आहे. त्यामुळे आजपर्यंत कधीही मिळाला नाही असा २०० रुपये प्रति किलो असा दर शेवग्याला मिळाला. गेल्या पंधरवड्यात हे दर असेच वाढून होते. किरकोळ बाजारात एका शेंगेची किंमत २० ते ३० रुपये झाली होती. पण तीही फारशी कुठे मिळत नव्हती. रोजच्या डाळीच्या आमटीबरोबरच दाक्षिणात्य पदार्थ करण्यासाठी शेवगा हा हमखास लागतोच. दक्षिण भारतीय पदार्थ विकणाऱ्या हॉटेलमध्ये तर शेवग्याला दुसरा पर्यायच नाही; पण वाढलेले दर आणि पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने त्यांनाही बऱ्याच वेळा मेनू बदलावा लागला आहे.
आवक कमी का झाली ?
वातावरणात होणारे बदल डिसेंबरपर्यंत लांबलेला पाऊस व धुक्यामुळे शेवग्याला चांगला फुलोरा आलेला नाही. फुलगळ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे फळधारणा होत नाही, जरी झालीच तर त्याची वाढ होत नाही, अथवा त्यात गर नसतो, त्यामुळे ही शेंग बाजारात विकण्याच्या योग्यतेची राहत नाही. आता तशीच परिस्थिती आहे. बरेच शेवगा प्लॉट वाया गेल्यात जमा आहेत. आता त्यांना उन्हाळ्यातील बहर घेता येणार आहे.
साऊथ मध्ये शेवग्याला मोठी मागणी असते, तमीळनाडू आणि सोलापूरमधून शेवग्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. साधारणपणे रोज १० टेम्पो येतात; पण गेले दोन महिने केवळ २ ते ३ टेम्पो येत आहेत. ३० किलोची एक पिशवी याप्रमाणे २० ते २५ पिशव्या येतात.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम