या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने जाहीर केला 200 कोटींचा निधी

1
39

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी आता 200 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन बसविला आहे, अशा शेतकऱ्यांसाठी हा निधी देण्यात आला आहे. राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी नुकतेच याबाबत शासन आदेश जारी करण्यात आल्याचे सांगितले आहे.

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनाकरता अनुदान दिले जाते. आता राज्य शासनाने सूक्ष्म सिंचन संच बसविणाऱ्या शेतकरी वर्गासाठी हे 200 कोटींचे अनुदान जाहीर केले आहे.

शेतीसाठी सिंचन हा एक पर्याय शेतकरी वर्ग वापरत आहे. आता राज्य शासनाने या सूक्ष्म सिंचन संच योजनेस चालना देण्यासाठी हा निधी घोषित केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here