टोमॅटोचे दर 140 रुपये किलो ; मेहनत एकाची अन फायदा मात्र दुसऱ्याचा

0
139

द पॉईंट नाऊ निधी : भारतात भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. त्यात टोमॅटो थेट 140 रुपये किलो पर्यंत पोहोचले आहेत.

देशभरात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. अनेकांच्या शेती पूर्णपणे उध्वस्त झाल्या आहेत. त्याचा परिणाम भाजीपल्यावर झाला आहे.

अवकाळी पावसामुळे शेती उध्वस्त झाली. त्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली. आणि त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर झाला आहे.

संपूर्ण देशभरात टोमॅटोच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दक्षिण भारतातील बऱ्याचश्या शहरांमध्ये तर टोमॅटो 140 रुपये दराने विकला जात आहे. अंदमान निकोबार मधल्या काही शहरांमध्ये टोमॅटो 140 रुपये किलो, तर काही शहरांमध्ये 125 रुपये किलो हुन अधिक दराने विकला जात आहे.

शेती हा भारतासाठी सर्वात महत्वाचा विषय आहे. भारताच्या आर्थिक व्यवस्थेला हातभार लावण्यात शेतीचा मोठा वाटा आहे. मात्र मागील 2-3 वर्षांपासून अवकाळी पावसाने शेतकरी वर्गास मोठ्या प्रमाणावर हैराण केले आहे. मोठ्या पोटतिडकीने शेतकरी आपली शेती करतो, शेतात पीक पिकवतो, कर्ज काढून पिकांची निगा राखतो. मात्र अवकाळी पावसाने पुर्णतः उध्वस्त केले आहे. त्यामुळे पिकांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे.

याच कारणास्तव दक्षिण भारतात पुरवठा कमी झाल्याने टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. महाराष्ट्रात देखील टोमॅटोचे दर शंभरी पार करून गेले आहेत. मात्र यात फायदा शेतकऱ्यांना नाही, तर किरकोळ विक्रेत्यांना होतो आहे.

कोरोनाने आधीच सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले. त्यामुळे महागाई प्रचंड वाढली आणि त्यात जीवनावश्यक गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत.

टोमॅटोचे दर शंभरी पार करून गेले आहेत. मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना नाहीच. प्रत्यक्षात टोमॅटोचे दर केवळ 25-30 रुपयांच्या जवळ आहेत. मात्र बाजारात सुळसुळाट असलेल्यांद्वारे कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आल्याने, टोमॅटोचे दर हे शंभरी पार करून गेले आहेत. या प्रकारामुळे असेच दिसते की, मेहनत एकाची अन फायदा मात्र दुसऱ्याचा अन बळी जातोय पहिल्यासह तिसऱ्याचा.

 

ही बातमी वाचलीत का?

नाशिकच्या हिरावाडी येथे पूजा पाठ करणाऱ्या पुरोहितांमध्येच हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

नाशिकचे त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आणि तीर्थक्षेत्र म्हणजे अतिशय शांततामय आणि पवित्र वातावरण. मात्र त्र्यंबकेश्वर येथे बऱ्याच वेळा इथल्या पुरोहितांमध्येच थेट हाणामारीच्या घटना घडल्या आहेत.

अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

पूजापाठ करणाऱ्या पुरोहिताने रोखला दुसऱ्यावर गावठी कट्टा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here