द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नोव्हेंबर महिना हा थंडीचा महिना म्हणून ओळखला जातो. मात्र सप्टेंबर, ऑक्टोबर,व नोव्हेंबर महिन्यात पाऊस पडण्यास बंद होतो. हवामानातील बदलामुळे पाऊस पडतांना पाहायला मिळतोय. त्यामळे आता पावसाळा आणि हिवाळा मिळून “हिवसाळा ” म्हणायचं की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण या “हिवसाळ्या” मुळे रब्बी पिकांना चांगला परिणाम होत असल्याचं सांगण्यात आले आहे.
आता हिवाळा सुरू झाला असला तरीदेखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामळे मुंबई सह राज्यभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्या पासूनच कोसळत असलेल्या पावसाने नोव्हेंबर महिन्यात देखील चांगली कामगिरी केली असून हा पाऊस रब्बी पिकांना दिलासा देईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या जिल्ह्यात 60 टक्के पावसाची नोंद:
1 ऑक्टोबर पासून 24 नोव्हेंबर पर्यंत ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, वाशीम आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 60 टक्क्यांहुन अधिक पावसाची नोंद झाली आहे.
20 ते 59 टक्के पावसाची नोंद:
पुणे, कोल्हापूर, नाशिक , धुळे , सोलापूर, उस्मानाबाद, जालना, लातुर, बुलढाणा, आणि अमरावती, या जिल्ह्यात 20 ते 59 टक्के पावसाची नोंद झाली आहे
सर्व साधारण पावसाची नोंद :
रायगड, रत्नागिरी, सातारा, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, यवतमाळ, आणि चंद्रपूर जिल्हात सर्वसाधारण पावसाची नोंद झाली आहे. मुंबई सह उर्वरित जिल्हात उणे पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासात कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र , विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे.
वातावरणात बदल झाले, कि पिकांवर सुद्धा बदल होतात . जास्त प्रमाणात पावसाने पिकांना नुकसान होत असल्याचा अंदाजही व्यक्त केला जातो. या वर्षी या दोन महिन्यात पडलेल्या पावसामुळे पिकांवर कोणतेही नुकसान न होता फायदा झाल्याच भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र सध्या दोन दिवस पाऊस पडत नसून थंडीच वातावरण निर्माण होत असल्याच दिसून येत आहे.
मुंबईत डिसेंबर मध्ये थंडीचं आगमन :
२५ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईच्या किमान तापमानात किंचित घट नोंदविण्यात आली आहे. शिवाय वाऱ्याच्या वेग देखील नोंद घेण्यासारखा आहे. महत्वाचे म्हणजे प्रदूषण देखील कमी झालं असून, दृश्य परिणता देखील उत्तम नोंदविण्यात आली आहे.
त्यामुळे हे वातावरण आता थंडीची प्रतीक्षा करत असून डिसेंबर महिन्याच्या सुरवातीपासून मुंबईकरांसाठी घटते किमान तापमान थंडी घेऊन येणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम