Mumbai : बकरी ईद हा मुस्लिम समुदायमध्ये बलिदानाचा दिवस मानला जातो. या दिवशी मुस्लिम समाज महागडे बकरे खरेदी करून त्यांचा बळी देतात. मुंबईतील मीरा भाईंदर येथील एका सोसायटीत एका मुस्लिम कुटुंबाने कुर्बानीसाठी बकरा खरेदी केला, मात्र त्यावरून गदारोळ झाला आहे. तो बकरी घेऊन सोसायटीत पोहोचताच काही लोकांनी विरोध केला आहे.हा वाद वाढला आणि सोसायटी मधील लोक विरोध करण्यासाठी पुढे आले. त्यामुळे हा गोंधळ अधिकच वाढला आणि बजरंग दलासह हिंदू संघटना तेथे पोहोचल्या. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. पोलिसांना देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
दरम्यान यावेळी हिंदू धर्मियांकडून हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले आणि या प्रसंगाची संवेदनशीलता पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी कसेबसे जमावाला तेथून हटवले. यावेळी पोलीस बळाचा वापर करण्यात आला असून अजूनही परिसरात तणाव आहे.
हे प्रकरण मुंबईतील जेपी नॉर्थ सोसायटी संबंधित आहे. येथे एका मुस्लिम कुटुंबाने कुर्बानीसाठी बकरा आणला होता. त्याला सोसायटीतील इतर सदस्यांनी विरोध केला. दोन्ही बाजूंनी वादावादी सुरू झाली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली.
सोसायटी मधील लोकांचा बोकडाच्या कुर्बानीला विरोध असल्याच सांगण्यात आलं आहे. बजरंग दलासह अनेक हिंदू संघटनांचे सदस्य त्याठिकाणी पोहोचले. दोन समाजातील वाद तापू लागला व हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.
या वेळी बजरंग दलाने धरणे आंदोलन करत हनुमान चालिसाचे पठण देखील केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बळाचा वापर करून लोकांना हटवले.या परिसरात तणावानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, सोसायटी आणि परिसरात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोणालाही गर्दी जमवण्याची परवानगी नाही. त्याचवेळी दोन्ही बाजूंकडून चर्चा सुरू आहे. बकरी ईदच्या निमित्ताने वातावरण बिघडू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम