द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार( दि २७) रोजी भारत बंदला प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर पाठींबा तसेच जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

या आशयाचे निवेदन तहसीलदार ,पोलीस ठाणे व बाजार समिती प्रशासनाला देण्यात आले. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे (दि २७) रोजी भारत बंद चे आवाहन करण्यात आले . या बंदला देवळा तालुका प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला .
यावेळी देवळा येथे कांदा लिलाव बंद करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. व निवेदन सादर करण्यात आले.याप्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॄष्णा जाधव , जिल्हा संघटक भाऊसाहेब मोरे, तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर ,उपाध्यक्ष हरीसिंग ठोके , नानाजी आहेर, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदीप भदाणे , स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजु शिरसाठ, समाधान शिरसाठ , बापू देवरे ,सुभाष पवार, बाळासाहेब पवार, दूष्यंत पवार ,शशिकांत शिंदे पवार, संदिप पवार, मामडू पवार ,राहुल हिरे , पंकज सुर्यवंशी, हेमंत निकम, दशरथ पुरकर आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम