निर्यातबंदी: 17 लाख टन गहू बंदरांवर पडून, पावसामुळे खराब होण्याची भिती

0
30

नवी दिल्ली: केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला, यास महिना उलटला. असे असले तरी निर्यातबंदीनंतर विविध बंदरांवर अडकून पडलेल्या गव्हाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. निर्यातबंदी आधी झालेले करार आहेत पूर्ण केले जातील, असे सरकारने स्पष्ट केले होते. त्यानुसार निर्यातबंदीनंतर सुमारे 4 लाख 69 हजार टन गहू निर्यातीला परवानगी देण्यात आली. परंतु आजघडीला बंदरांवर किमान 17 लाख टन गहू पडून आहे. आता लवकरच पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा गहू पावसात भिजून खराब होण्याची भीती आहे.

निर्यातबंदीमुळे मे महिन्यातील गहू निर्यात 11.3 लाख टनावर घसरली. एप्रिल महिन्यात 14.6 लाख टन इतकी विक्रमी गहू निर्यात झाली होती. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. उष्णतेच्या लाटेमुळे देशातील उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे आणि गव्हाच्या किंमती वाढल्याने सरकारने 13 मे रोजी गव्हावर निर्यातबंदी लागू केली. पण ज्या व्यवहारांमध्ये लेटर ऑफ क्रेडीट जारी करण्यात आले आहेत त्यांना या बंदीतून वगळण्यात आले.

गुजरातमध्ये सर्वाधिक गहू पडून

तसेच भारत सरकारने ज्या देशांना अन्नसुरक्षेसाठी गहू पुरवण्याची परवानगी दिली आहे, त्यांना गहू निर्यात करण्यास मुभा देण्यात आली होती. परंतु अजूनही किमान 17 लाख टन गहू वेगवेगळ्या बंदरांवर अडकून पडला आहे. गुजरातमधील कांडला आणि मुंद्रा या दोन बंदरांवरच सगळ्यात जास्त गव्हाचा साठा अडकून पडला आहे. या दोन ठिकाणी मिळून एकूण 13 लाख टन गहू आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here