कृषी प्रतिनिधी : शेतकरी राब राब राबून देखील कृषी प्रधान देशात शेतकरी फसवत जातच असेल तर राज्यकर्त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे आज सकाळी उघडकीस आली.
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.दे येथील योगेश दिलीप पवार (वय ४०) यांनी बॅंकेच्या कर्जाला कंटाळून आंबा फाटाजवळील मन्याड डॅम येथे विष घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना सकाळी सुमारास घडली आहे. गावातील भाऊसाहेब हिम्मत पवार, कैलास बाबुराव देवरे, दिलीप उत्तम पवार यांना योगेश बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. योगेशला गावकऱ्यांनी खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल केले मात्र योगेला हॉस्पिटल जाण्याआधी मृत्यू झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. योगेशच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
घरातील कर्ता पुरुष गेल्याने हळहळ
पवार कुटुंबाच्या घरात अगोदरच अठरा विश्व दारिद्री आहे. घरातील कर्ता पुरुषच काळाच्या पडद्याआड गेल्याने गावासह परिसर सुन्न झाला आहे. तत्पूर्वी या घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम