हिंगोली बाजार समितीत माल साठवणीस जागा नाही, शेतकरी हतबल 

0
77

हिंगोली येथील कृषी बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल साठवणीकरिता जागा नाही. शेतकरी भर रस्त्यातवर आणलेला माल ठेवताना दिसतात. त्यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. राज्यात अवकाळी पाऊसाची चिन्हे दिसतात. ढगाळ वातावरण असून, अवकाळी पावसाची शक्यता आहे. पाऊस आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

हिंगोली तालुक्यात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात भुईमुगाची पेरणी केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पिक आणले. बाजार समितीत जागेच्या अभावी शेतकऱ्यांना आपल्याकडील माल रस्त्यावर उन्हात टाकावा लागला. परंतु अचानक मंगळवारी वातावरणात जसजसा बदलून लागले, तर शेतकरी आपला माल विकण्यासाठी धडपड करीत होते. शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली परंतु, ठेवण्यासाठी शेडमध्ये जागा नसल्याने शेतकऱ्यांना हळद रस्त्यावर ठेवावी लागली, परंतु पावसाने तिचे नुकसान झाले होते.

मालाची अवाक झाल्याने बाजारात अनेक वेळा अडचण निर्माण झाली. समितीत हळदीचा नुकसान होऊन देखील समितीने शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजना केल्या नाहीत. शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेला आपला माल रस्त्यावर टाकण्याची वेळ आली तरी , याकडे बाजार समितीच्या प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे बाजार समितीने मालाच्या जागेसाठी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्या आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here