तालुक्यांत पाण्याची टंचाई ; प्रशासनाकडून टॅंकरने केला पाणी पुरवठाँ

0
50

राज्यात कडाक्याच्या उन्हामुळे गावातील विहिरी आटून गेले आहेत त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. जिल्ह्यात चार गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली त्याकरता प्रशासनाकडून टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सध्याच्या कडक उन्हाळय़ात तहान भागवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे.

आता उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई सध्या निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील चार तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांतील ४० हजार लोकसंख्या आहे. या सर्व गावात २१ टॅंकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे. एकूण २१ टॅंकरच्या माध्यमातून ७० टॅंकर खेपा करून ४० हजार लोकांची तहान भागविली जात आहे.

जिल्‍ह्यातील सध्या नगर, अकोले, संगमनेर व पारनेर तालुक्यातील काही गावे व वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.मान्सून वेळेअगोदर येणार असल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मान्सून जर वेळेवर आला नाही तर टॅंकरची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here