द पॉईंट नाऊ प्रतिनिधी; सिताफळा सर्वांच्याच आवडीचा फळा असतो त्यामुळे त्याच्या मागण्या ही असतात मात्र ऑगस्ट ते डिसेंबरच्या कालावधी पर्यंत सातत्यानं सीताफळाची मागणी जास्त असते त्यामुळे फळांमध्ये सीताफळाचा समावेश जास्त असतो.
सीताफळाची मागणी जास्त असल्याने प्रत्येक किलो 10 ते 200 रुपयांपर्यंत दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांना चांगला आधार मिळाला आहे दसरा , दिवाळी व त्या पुढील काळ हा विविध फळांच्या बाजारपेठेतील आवकेचा असतो.
आणि त्यामुळेच मागणी असलेलं सीताफळ हे महत्त्वाचे पीक आहे या पिकामुळे अनेक जिल्ह्यातील भागातून मोठ्या प्रमाणात आवक होते.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे थेट परिणाम विक्रीवर होतोय आणि त्यामुळे विक्री करण्यास अडचणी निर्माण होतात मात्र आता शेतकऱ्यांसाठी सीताफळ हा चांगलाच आधार बनला यात मागणी अधिक राहिल्याने दरात वाढ होऊन प्रति किलोला 200 रुपयांपर्यंतचा उंच्चाकी दर मिळाला.
यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आधार मिळाला आहे दररोज चार ते पाच टन आवक सुरू असून प्रत्येक किलोला 10 रुपयांपर्यंत ते 70 रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
सीताफळाचा बासुंदी, कुल्फी, आईस्क्रीम, रबडी, आधी पदार्थांसाठी मागणी असते. सिताफळापासून बनवलेल्या पदार्थाना लोक जास्त पसंदी देतात त्यामुळे त्याचा मागणी जास्त प्रमाणत केल्या जातात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. मार्केटमध्ये हंगामात चांगली आवक होत असली तरी इतर वेळेस ती दररोज तीन ते दहा टनांपर्यंत असते. फळाचा सरासरी 60 पासून 80 रुपये दर मिळत असून महिन्याला सरासरी 4 ते 5 कोटींची उलाढाल होत असावे असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
राज्यातील या भागातून होतो आवक ;
राज्यात जवळपास 10 ते 15 हजार हेक्टरी क्षेत्र सिताफळा खाली आहेत. पुणे मार्केट मध्ये या जिल्ह्यातील वडकी, खेड ,राजगुरुनगर, उरुळी, कांचन, लोणी, यावत, पाटस, नगरमधील, सातारा, पारनेर, नेवासा, औरंगाबाद या भागातून मोठ्या प्रमाणात आवक होते.
यंदाचे दर प्रतिकिलो रुपये;
जुन ते ऑक्टोंबर 50 ते 200
ऑक्टोबर ते नोव्हेंबर द10 ते 100
डिसेंबर ते जानेवारी 40 ते 200
हे ही वाचा ;
विधानसभेसमोर होणार कंगनाची झाडाझडती https://thepointnow.in/?p=3304
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भारताला (India) 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य (Independence) हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) वादात सापडली होती. यानंतर तिने शिखांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे ती आता चांगलीच अडचणीत आली आहे. या प्रकरणी दिल्ली विधानसभेच्या समितीसमोर हजर राहण्याचा आदेश तिला बजावण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम