द पॉईंट नाऊ ब्युरो : शेतकरी वर्गाला धक्का देणारी बातमी आहे. आता तुम्ही जर शेतसारा भरला नाही, तर तुमची जमीन सरकारची होणार आहे. याबाबत राज्य शासनाने नुकताच निर्णय घेतला.
शेतसारा भरणाऱ्यांमध्ये थकबाकीदार वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वारंवार नोटीस देऊनही शेतसारा भरला जात नाही. याच कारणास्तव राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. आता यापुढे जो कोणी शेतसारा भरणार नाही अशांच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासनाचा शिक्का बसणार आहे. यामुळे शेतसारा न भरणाऱ्यांची नक्कीच झोप उडणार आहे.
शासनाचा आर्थिक कारभार हा कर प्रणालीवर चालतो. त्यात शेतीवरही शेतसारा असतो. मात्र शेतसारा भरणारे आदमुठेपणा करत शेतसारा भरण्यात टाळाटाळ करतात. अशांना आता शासनाने मोठा धक्का दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम