शेतकऱ्यांना मिळालाय दिलासा ! संपूर्ण ऊस गाळप होऊनच कारखाने बंद होणार

0
32

जिल्ह्यातील हिंगणी गाव येथे शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येनंतर जमाव संतप्त झाला आहे. नामदेव आसाराम जाधव असे मृत शेतकऱ्याचे नाव होते. राज्य सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. राज्यात उसाचे गाळपावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात उसाचे गाळप होत नसल्याने बीड जिल्ह्यातील हिंगणगाव येथील एका शेतकऱ्याने १२ मे रोजी शेतातील ऊस पेटवून लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली होती. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले याकडे लक्ष देत सरकारने निर्णय घेतला.

शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहणार आहेत. त्यासाठी १ मे नंतर होणारया ऊसाच्या गाळप कारखान्यांना अतिरिक्त ऊस गाळप अनुदान दिले जाणार आहे.या निर्णयानुसार सर्व पात्र साखर कारखान्यांना २०० रुपये प्रति टन ऊसाला अनुदान देण्यात येणार आहे.असा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.

१ मे २०२२ पासुन गाळप होणाऱ्या व साखर उताऱ्यामध्ये १० टक्केपेक्षा ०.५ टक्के घट कमी आल्यास व अंतिम साखर उतारा १० टक्‍क्‍यांपेक्षा कमी येणारे कारखानेची घट उतारा अनुदानास पात्र राहणार आहेत. याशिवाय ५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या उसासाठी ५ रुपये प्रति टन वाहतूक अनुदान देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

यानुसार १ मे रोजी सुरु असलेल्या १०३ कारखान्यांपैकी वरील अटी पात्र करणारे कारखाने ५१ आहेत. यामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे १०० कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here