द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : हिंगोली मधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी भोंग्यांच्या वक्तव्यावरून संतापले. शेतकऱ्यांचे प्रश्न एवढे वाढले आहेत की त्यांच्या आत्महत्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतामधील झाडांवर शेतकऱ्यांची प्रेत लटकत आहेत. लटकलेली प्रेत आधी खाली उतरवा मग भोंगे उतरवायचे की नाही यावर निर्णय घ्या अशी स्पष्ट भूमिका राजू शेट्टी यांनी बजावली.
महागाईमुळे खतांच्या किंमती वाढल्या आहेत , हवा तितका हमी भाव शेतकऱ्याला मिळत नाहीये, इंधनाच्या किंमती वाढत आहेत, घरगुती गॅसच्या दरात होणारी वाढ या सर्व भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. दोन महिने होतात तरी विजेच्या डीप्या दुरुस्त होत नाही त्यामुळे शेताला पाणी मिळत नाही आणि शेत करपत. हे आमचे मूलभूत प्रश्न आहेत ह्यावर चर्चा न होता महाराष्ट्रात भलतेच मुद्दे उचलून धरण्यात येत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामधून शेतकऱ्याचा आवाज बाहेर पडणे गरजेचे आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
शेती पिकाला हमी भाव मिळेल असा कायदा केंद्र सरकारने तयार करावा, शेतीला १० तास वीज द्यावी, शेती साठी चालू असलेले भारनियमन त्वरित मागे घ्यावे, रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्यावी, अश्या अनेक मागण्या राजू शेट्टी यांनी केल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणी बोलायला तयार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा मग भोंगे उतरवा अस म्हणत त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर थेट टीका केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम