शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढवली; येत्या 4-5 दिवसात महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज

0
36

द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे चिंता वाढली आहे. येत्या चार – पाच दिवसात राज्यातील काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आधीच कोरोना आणि त्यात अवकाळी पावसाने अनेक वेळा हजेरी लावून शेतकऱ्यांचे हाल केले आहेत. शेतकरी आधीच्या संकटातुन सावरला नसतांना, आता पुन्हा पावसाच्या इशाऱ्याने चिंता वाढली आहे.

मागील काही दिवसांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. आता पुन्हा कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here