रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे. मोदी सरकारकडून रेशनच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेत जूनपासून गहू कमी आणि तांदूळ जास्त वाटप केले जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात पात्र नसलेले शिधापत्रिकाधारकांची संख्या वाढली आहे. मात्र, प्रशासनाने अशा राशनधारकांनवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.
गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीमध्ये वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले, ”उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गव्हाचे वाटप कमी होण्याचे कारण गव्हाची खरेदी कमी आहे. या काळात जवळपास 55 लाख मेट्रिक टन तांदळाचे जास्त प्रमाणात वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.” सर्व सामान्यांनसाठी दिलासा देणारी बाब आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सरकारकडून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वाटप केले जातेय. या बदलानंतर यूपी , बिहार आणि केरळमध्ये गहू मोफत वितरणासाठी उपलब्ध होणार नाही. दिल्ली , गुजरात झारखंड मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हाचा कोटा कमी केला आहे. बाकी राज्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम