जळगाव प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्रातील शेतकरी चहुबाजूंनी समस्यांनी घेरला गेला आहे. बेमोसमी वातावरणामुळे अनेक पिकांना फटका बसत आहे. सध्या थंडीचे प्रमाण वाढल्याने कलिंगडाच्या रोपांना त्याचा फटका बसत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांने एक नामी शक्कल लढवली आहे. रात्री थंडीपासून कलिंगड रोपांना संरक्षण म्हणून क्राॅपकव्हर टाकण्यात आले आहे नरेंद्र मधुकर पाटील यांनी आपल्या शेतातील रोपांसाठी हा प्रयोग केला आहे.

वातावरण होणारे अचानक बदल यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतोय शेतकऱ्यांना सरकारवर अवलंबून न राहता स्वतःलाच प्रयोगशील व्हावे लागेल याचे उदाहरण या शेतकऱ्यांनी दिले आहे. शेतकरी शेतात राबतो मात्र त्याला त्याचा मोबदला मिळणं अपेक्षित असल्याने अस प्रयोगशील होऊन नुकसान टाळणे हाच पर्याय आहे.
शेतकऱ्यांना वेळोवेळी येणारे संकट यामुळे अतोनात नुकसान होत असून, खर्च वाढला मात्र उत्पन्न वाढत नसल्याने शेतकरी निराशेच्या गर्तेत जात आहे. याला लगाम घालण्यासाठी शेतकऱ्यांना कंबर कसावे लागणार आहे.
आपणही आपल्या भागातील सक्सेस शेतकऱ्यांच्या गाथा आम्हाला पाठवू शकता – 9579492684
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम