यांकडून PM किसान योजनेचे पैसे सरकार परत घेणार?

0
32

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : पीएम किसान योजने अंतर्गत येणारे पैसे बहुतांश अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत. अशा शेतकऱ्यांना आता ते पैसे परत करावे लागणार आहेत.

1 जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. मात्र यात 7 लाखांच्या जवळपास अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पैसे जमा झाले आहेत. अशा लोकांना आता सरकारला पैसे परत करावे लागतील. अपात्र शेतकरी वर्गामध्ये बहुतांश जण हे इन्कमटॅक्स भरणारे आहेत. त्यामुळे अशा सर्वांना आलेले पैसे शासनाला परत करावे लागणार आहेत. सरकार अशा अपात्र लोकांच्या खात्यातून पैसे परत घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकार द्वारे शेतकरी वर्गाला PM किसान योजना अंतर्गत मदत करते. याजोगे वर्षाभरात शेतकऱ्यांना दोन – दोन हजारांच्या टप्प्याने जवळपास 3 हफ्ते मिळतात.

आता अपात्र लोकांकडून सरकार पैसे परत घेणार असल्याने, सदर अपात्र शेतकऱ्यांचे नक्कीच धाबे दणाणले असेल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here