सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाच्या भाव वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजारपेठेत आवक आणि मागणीतील तुटीमुळे डाळिंबाचे दरात वाढ होत असल्याचे बाजार समितीतून माहिती मिळाली आहे. डाळिंब फळपीक यंदा मोठ्या अडचणीत आले आहे.
अवकाळी पावसामुळे फळांवरील रोगराई वाढली आहे. रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे निर्यात घट झाली आहे. बाजार समितीच्या बाजारपेठेत डाळिंबाची आवक रोज पाचशे ते सातशे क्विंटल एवढीच झाली आहे. डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक १३००० रुपये असा दर मिळाला. चांगला बाजार भाव भेटल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.
देशांतर्गत बाजारातही यंदा डाळिंब कमी प्रमाणात दिसून आले. राज्य सरकारने फळबाग लागवड योजनेतून आर्थिक मदत केली जाईल. शेतकरी पुन्हा डाळिंब शेती करतील असा विश्वास दिसत आहे. डाळिंबाची आवक प्रामुख्याने सांगोला, मंगळवेढा, माढा, मोहोळ या स्थानिक भागातूनच होते. राज्यात सोलापूर, माणदेश, पुणे आणि सांगली जिल्ह्याचा दुष्काळी परिसर, अहमदनगर आणि मराठवाड्यात डाळिंबाचे क्षेत्र वाढले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम