नाशिक – शेतकऱ्यांना दिलासा! अवकाळी पाऊस-गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार

0
32

द पॉईंट नाऊ ब्युरो : उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

नाशिक विभागात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. बहुतांश शेतकरी वर्गाचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे अशा नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकसातग्रस्त शेतकऱ्यांना आता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार मदत केली जाणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषदेत दिली.

नुकतीच नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता वडेट्टीवार यांच्या सांगण्यानुसार शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here