कृत्रिम खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाला राज्य कांदा उत्पादक संघटनेकडून महत्त्वाची सूचना

0
9

द पॉईंट नाऊ ब्युरो : शेतकरी अडचणीत असतांना अधिकारी वर्ग मात्र सुस्तीत आहे. कुठेही खतांच्या टंचाईवर कारवाई होतांना दिसली नाही. चढ्या दराने सरास खत विक्री होत असतांना कारवाई मात्र शून्यच आहे. या संदर्भात कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने कृषी विभागाला काही सल्ले दिले आहेत. खतांचे अवास्तव दर असो किंवा इतर कृषी निविष्ठा खरेदीच्या बाबतीत कृषी सेवा केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची खरोखर लुट होऊ नये असे वाटत असेल तर कृषी विभागाने तात्काळ एक स्वतंत्र व्हाट्सअप (Whatsapp ) तक्रार नंबर शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी संगटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

ज्या ज्या शेतकऱ्यांना खते, औषधे, बियाणेच्या बाबतीत कृषी विभागाकडे तक्रार करायची असेल ते शेतकरी संबंधित दुकानदाराची कृषी खात्याने उपलब्ध करून दिलेल्या व्हाट्सअप तक्रार नंबरवर तक्रार करतील. कृषी विभागाने हा उपक्रम सुरू केल्यास संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम फायद्याचा ठरेल.

सध्या नावाला कारवाई केली जाते किंवा आर्थिक धागेदोरे असल्याने कारवाईला कोणी धजावत नाही. समजा शेतकऱ्यांनी उघडपणे तक्रार केली तर त्या दुकानदारांच्या हिटलिस्टवर तो शेतकरी कायमस्वरूपी असतो. शेतकरी कायम अडचणीत असल्याने त्याला काहीवेळा उधारीने खत खाद्य, औषध घ्यावे लागते अशावेळी त्याला दुकानदार उभा करणार नाही. म्हणून कुठला शेतकरी समोर येऊन बोलत नाही. या भितीमुळे शेतकरी अन्याय सहन करत असून त्याला कोणीही वाली नाही असे चित्र सध्या निर्माण झालं आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here