नाशिक प्रतिनिधी : गेल्या वर्षी कांदा बियाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला तसेच वर्षभराचे गणित बिघडले आहेत. यावर्षी असी फसवणूक झाल्यास गाठ आमच्याशी आहे. असा इशारा कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे यांनी दिला.
कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची मागील वर्षी फसवणूक करण्यात आली. शेतकऱ्यांना बोगस कांदा बियाणे मिळाले, या एका कारणामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने सातत्याने कांदा बियाणे मध्ये शेतकऱ्यांनी स्वतः साठी लागणारे , लाल व उन्हाळी कांद्याचे बियाणे स्वतः घरीच तयार करावे. यासाठी राज्यव्यापी मोहीम चालवली होती. त्या माध्यमातून आज असंख्य कांदा उत्पादक शेतकरी बांधवांकडे घरचेच स्वतःचे कांदा बियाणे तयार आहे. परंतु खराब हवामान, गारपीट अवेळी आलेला पाऊस तर काही भागांमध्ये विविध रोगांना बळी पडल्याने कांद्याचे बियाणे प्लॉट खराब झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना कांदा बियाणे कमी उत्पादन झालेले, असल्याने यावर्षी लाल व उन्हाळी कांद्याचे बियाणे खरेदी करावे लागणार आहे.
वेगवेगळ्या फेसबुक ,व्हाट्सअप , चॅनलवरून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बोगस कांदा बियाणे विक्री करणाऱ्या भामट्यांचा याही वर्षी मोठ्या प्रमाणात सूळसुळाट झालेला आहे. आमच्याकडे खात्रीशीर कांदा बियाणे मिळेल अशी जाहिरात करणाऱ्यांना जाब विचारा असे आवाहन दिघोळे यांनी केले. तसेच त्यांचे पूर्ण नाव, पत्ता मोबाईल नंबर एकूण विक्रीसाठी बियाणे किती आहे आणि त्यांच्या बियाण्याचा किलोचा भाव किती आहे तसेच मागील वर्षी ज्या ज्या शेतकऱ्यांना कांदा बियाणे दिले होते त्यातील काही मोजक्या 5-10 शेतकऱ्यांचे नाव पत्ता व मोबाईल नंबर कांदा बियाणे खरेदी पूर्वी माहिती करून घ्या तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर रोखीने व्यवहार न करता ऑनलाईन किंवा बँकेच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करा मगच कांदा बियाणे घ्या. जेणेकरून फसवणूक थांबेल व कांदा बियाणे मुळे होणारे नुकसान थांबेल.
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीचा कायमचा बंदोबस्त करावा. त्यांचा परवाना रद्द करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक संघटनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
बरोबर आहे साहेब काही लोकांनी फसवनु केली पन आम्ही कांदा बि उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत हि बाब लक्ष्यात घ्या . शेतकऱ्यांना फसवेल त्याला नरकात पन जागा मिळणार नाही . असो आमच्या गावी या .आम्ही खरे शेतकरी आहोत का नाही ते तपासून पहा . गावरान उन्हाळी बि आहे . पण एक गोष्ट मी सांगतो तुमच्याकडील लोक स्वस्त भावात येऊन बी घेऊन जातात आणि तेच बी तुमच्याकडील लोकांना डबल टिबल च्या भावाने विकतात मग ते लोक हा विचार करत नाही की आपल्याला बी कोणत्या क्वालिटीचे मिळत आहे आणि आपण ते बिग घेऊन आपण बसणार तर नाही ना अशा पद्धतीने तुमच्याकडील लोकच तुमच्याकडील शेतकऱ्यांना बऱ्यापैकी बसवण्याचे काम करतात आणि आम्ही खरे कांदा उत्पादक शेतकरी मात्र फुकट बदनाम होतो
तुमच्या नाशिक विभागातल्या काही शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून किंवा तुमच्याकडील काही नफा कर व्यक्तींनी औरंगाबाद कडील शेतकऱ्यांकडून बियाणे घेऊन गेले ते बियाणे आपल्या मनाप्रमाणे किंवा घेतलेल्या दामा पेक्षा डबल टिबल किमतीने विकली खऱ्या अर्थाने तुमच्याकडील लोकांनीच तुमच्या लोकांना फसवलं आणि खरा कांदा उत्पादक शेतकरी मात्र आज फुकट बदनाम होतोय माझ्याकडे उन्हाळा गावरान कांद्याचे बी आहे वाजवी भावात एखादा शेतकरी घेत असेल तर त्या शेतकऱ्याला ठरलेल्या भावाच्या अर्ध्या किमतीच्या रोख रकमेवर मी द्यायला तयार आहे बाकीच्या अर्ध्या किमतीचा त्या शेतकऱ्याने चेक द्यावा जर जर खराब निघाले तर त्या शेतकऱ्यांनी येण्या-जाण्याचा खाण्यापिण्याचा आणिआणि बियाणे च्या किमतीच्या डबल ने पैसे द्यायला तयार आहे मी पीक आहे त्यामुळे मी त्या बियाण्याची शंभर टक्के गॅरंटी घेतो