जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यातील विटनेर येथील शेतकऱ्याने कर्जाच्या बोजा असल्याने खचून शेवटी विष घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या अजूनही थांबत नसल्याने ही भयावह परिस्थिती कशी थांबणार याकडे लक्ष लागून आहे. राज्यातील सरकार देखील शेतकऱ्यांना वाली नसल्याचे चित्र आहे.
जळगाव जिल्हा तसा दुष्काळी जिल्हा, शेतकरी गोकुळ पांडुरंग वराविटनेर येथील शेतकऱ्याने कर्जाला वैतागून विष घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गोकुळ वराडे हे मकरसंक्रातीच्या दिवशी शेतात फवारणीसाठी गेले होते. या दरम्यान त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले असल्याची माहिती आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटूंबियांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
स्टेट बँकेकडून कर्ज
वराडे त्यांच्याकडे स्वमालकीचे विटनेर शिवारात एकूण ८० आर जमिनीचे क्षेत्र आहे. त्यांनी जळके स्टेट बँक शाखेतून शेतासाठी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम