उष्णतेपासून नागरिकांना दिलासा ; विदर्भात मात्र तुरळक पाऊस

0
40

नाशिक प्रतिनिधी : राज्यात उष्णतेच्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे. मुंबई सह कोकण वगळता महाराष्ट्रातील कमाल तापमान हे सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्रीने अधिक म्हणजे  ३८ ते ४३ डिग्री पर्यंत होते. तर पहाटचे किमान तापमान हे महाराष्ट्रात जवळ पास काही ठिकाणे वगळता सरासरी एवढेच होते. विदर्भात उष्णतेचा आलेख हा सरासरी पेक्षा चढता होता.  परंतु परवा  दि. ४ पासुन उष्णतेची काहिली कमी होण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले.

मंगळवार दि. ५ पासुन ते पुढील ३ दिवस म्हणजे ७ एप्रिल पर्यंत मुंबई ठाणे सह संपूर्ण कोकण, नाशिक सह खान्देश तसेच नगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यात व  बुधवार दि.६ पासुन नागपूर सह विदर्भात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच अगदी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

चालु एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात एकंदरीत तापमान हे सरासरी पेक्षा अधिकच असेल.

दरम्यानच्या कालावधीत देशात, म.प्रदेश , राजस्थान, उ. प्रदेश व अति उत्तरेकडील राज्यात उष्णतेची लाट तर अंदमानसह दक्षिणेकडील  ४ राज्यात व पूर्वोत्तरकडील ७ राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राजस्थानाच्या मारवाड भागात पुढील पाच दिवस धुळीचे लोट उठवणारे ताशी ३० किमी असे वेगवान वारेही वाहतील. बुधवार  ६ एप्रिल पासुन अंदमानच्या वर उंचावर आकाशात चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार होऊन बं उपसागरात गुरुवारी दि. ७ एप्रिलला कमी दाबाचे क्षेत्र तयार होवु शकते. व त्यानंतर तेथे वेगवान वाऱ्यासहित जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

उष्णता कमी का होते ?
लघु पल्ल्याची उष्णतेची लाट ही थोड्या दिवसापूर्ती असते. ज्या कारणाने उ. लाट आली ती करणे ओसंरली म्हणजेच त्या भुभागावर हवेचा दाब कमी होणे, म्हणजेच हवेची घनता कमी होणे. तसेच वाऱ्याचे वहन(वेग )वाढणे. निरभ्र आकाशामुळे संध्याकाळी ७ नंतर वेगाने जमीन थंड होणे व रात्री १२ – १ नंतर थंडावा जाणवू लागतो , व किमान तापमानही सरासरीच्या पातळीत राहते. शिवाय सकाळची आर्द्रता कमी होते. ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम उष्णता सरासरी ठेवण्यास मदत होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here