अमरावती जिल्ह्यातील अतिसंवेदनशील परिचित असणारे अचलपूरमध्ये झेंडा लावण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले आणि दगडफेकीत झाले. तात्काळ माहिती मिळताच वाद विकोपाला जाऊ नये याकरता शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे.
सध्या राज्यात हिंदुत्वाच्या वादावर राजकीय वातावरण चांगलेच खवळले असताना अमरावतीत देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीच्या अचलपूर आणि परतवाडा शहरात रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास झेंडा काढून टाकण्याचा वाद विकोपाला पोहोचला. शहरातील ऐतिहासिक असलेल्या मोठ्या प्रवेशद्वार येथे खिडकी गेट आणि दुल्हा गेट दरवाजांवर दरवर्षी सणसमारंभ असल्यास विविध धर्माचे झेंडे लावले जातात.
असलपूर येथे रात्री बाराच्या सुमारास काही असामाजिक तत्वांनी येथील झेंडा काढलाने वाद निर्माण झाला. काही काळात वादाचे रूपांतर दगडफेक आणि दंगलीत झाले. मध्यरात्रीच्या सुमारास शहरात झालेला हा वाद विकोपाला पोचण्याआधीच माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी संतप्त जमावाच्या वादाला नियंत्रणात आणला.
अमरावतीत घडलेल्या धक्कादायक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अचलपुरात दोन गटात झालेला वाद मिटविण्यासाठी घटनास्थळी हजर असलेल्या पोलिसांवर संतप्त जमावाने दगडफेक केला. यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. तर या गटातील राड्यात 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर सहा जणांना अटक करण्यात आली आहे. काही काळाने परिस्थिती नियंत्रणात आली असून असलपूर परतवाडा येथील शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम